सोमवार, २९ जुलै, २०२४

सेक्युलर आता शांत का ?

अमित साळुंखे हा गोंधळी समाजाचा आहे. तर विद्या किर्तीशाही ही बौद्ध समाजाची… या दोघांनी आंतरधर्मीय विवाह केला. पण आपल्या समाजात जाती व्यवस्थेची पाळमुळं खोलवर रोवलेली आहेत. याच जातीव्यवस्थेने अमितचा जीव घेतला. आंतरधर्मीय लग्न केल्याच्या रागातून विद्याच्या घरच्यांनी अमितची हत्या केली. अमितच्या हत्येने अनेक सवाल निर्माण झालेत. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी जातीव्यवस्था नाकारली. त्यांच्या विचारांना मानणाऱ्या, त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालणाऱ्या अनुयायांनी जातीभेदामुळे आपल्याच मुलीच्या पतीची हत्या करावी? आपली जात आपल्याच मुलीच्या सुखाच्या आड यावी? व या सर्व प्रकरणावर सेक्युलर किड्यांनी मुग गिळून शांत राहावे हे विशेष आहे.




सदर प्रकरणात मुलीच्या दलीत बापाकडून व भावाकडून अमितची हत्या केली गेली आहे. परंतु हीच हत्या एखाद्या सवर्णा कडून झाली असती तर एव्हाना महाराष्ट्र पेटला असता किंवा जाणीवपूर्वक पेटवला गेला असता. स्वतःला सेक्युलर म्हणवून घेणारया बेगडी पत्रकारांनी व नेत्यांनी अनेक मोर्चे व आंदोलने केली असती परंतु आता सर्व शांत आहेत. आंबेडकरी विचार तोंडाने बोलणे वेगळे व प्रतक्ष जगणे वेगळे. संवेदनशीलता या शब्दाचा अर्थ सांगताना एकेठिकाणी बाबासाहेब सांगतात संवेदनशीलता ती नाही जी जातीनिहाय किंवा विचार निहाय येते एखाद्या चुकीच्या घटनेचा बळी तुमचा शत्रू जरी झाला तरी त्या बद्दलची संवेदना जागरूक होणे हीच खरी संवेदनशीलता. उदा. एखाद्या माणसावर अन्याय झाल्या नंतर ती व्यक्ती आपल्या विचार धारेची आहे किंवा आपल्या जातीची आहे हे कळल्यानंतर जर तुम्हाला दुख होत असेल तर ती संवेदनशीलता बेगडी आहे खोटी आहे. 

     अमित साळुंखे आणि विद्या किर्तीशाही ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. जगाचा, जाती-पातीचा विचार न करता दोघं प्रेमविवाह करतात. पण सुखी संसाराला सुरुवात होताच त्यांची सुखी संसराची स्वप्न धुळीस मिळवली जातात. कारण मुलीच्या घरचे तिच्या पतीची हत्या करतात.भारतात जातीव्यवस्थेची मूळं किती घट्ट रोवलेली आहेत. याची साक्ष देणारी घटना छत्रपती संभाजीनगरमधून समोर आली आहे. आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून अमित नामक तरूणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. विद्या आणि अमित… दोघेही एकाच गावचे… लहानपणापासून दोघे एकत्र वाढले. पुढे या दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं. विद्याच्या घरच्यांनी तिच्या लग्नासाठी मुलगा बघायला सुरुवात केली. पण या दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. म्हणून पुण्यात येत या दोघांनी लग्न केलं. रजिस्टर मॅरेज केलं. मुलीच्या घरच्यांना वाईट वाटू नये म्हणून पुन्हा अमित व विद्याने बौद्ध पद्धतीने पुन्हा लग्न केलं. लग्नाला एक महिना होतो न होतो तोच अमित साळुंखेची हत्या केली गेली.

संध्याकाळच्या वेळी अमित पबजी गेम खेळत होता. इतक्यात गावातील मुलांनी त्याला घराबाहेर बोलावून घेतलं. अमित हातात मोबाईल घेत घराबाहेर गेला. घराजवळच्या झालाखाली तो त्या मुलांसोबत जाऊन बसला. इतक्यात गावातली लाईट गेली अन् अमितवर सपासप वार झाले. क्षणार्धात अमितचा देह रक्ताने माखला. त्याच्या पोटात चाकूने वार केला गेला. त्याचे आतडे पोटाच्या बाहेर आले. अमितचा आवाज घरच्यांना आला. त्याचा भाऊ पळत झाडाच्या दिशेने गेला. त्याने पाहिलं तर अमित रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. अमितला दवाखान्यात नेण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. १४ जुलैला ही घटना घडली आहे. अमितची हत्या करणाऱ्या माझ्या भावाला आणि वडिलांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी विद्याने केली आहे.

घटना विरोधी बाजूने घडली असतीतर एव्हाना संसदेत देखील याचे पडसाद उमटले असते परंतु जातीवादाची एकतर्फी पट्टी बांधलेले सेक्युलर आता शांत का ? हीच खरी शोकांतिका. 





   -जयदिप गवाळे-



'इडा पिडा टळू दे ! बळीचे राज्य येउदे '

 बळी राजाला काळजांच्या आत जपून ठेवावा , असा निरागस ' माणूस ' ! आपल्या प्रजेतील प्रत्येक व्यक्तीला कष्टाचे व हक्काचे फळ सम प्रमाणात व...